Darya Firasti

तोंडवळी चा वाघेश्वर

मालवण पासून फार दूर नाही तरीही खूप शांत, निवांत, निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं एक ठिकाण म्हणजे तोंडवळी. या जागेचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं असलेली वनराई. सहसा समुद्रकिनाऱ्याच्या इतक्याजवळ इतकी दाट वनराई पाहायला मिळत नाही. इथे फक्त वनराई आहे असंच नाही तर इथं खूप जंगली प्राण्यांचा वावरही आहे. अर्थात तिथं नेहमी राहणाऱ्यांनी अनेकदा मार्जार श्रेणीतील पट्टेरी वाघ आणि बिबट्या अशा दोन्ही शिकारी प्राण्यांचं दर्शन घेतले आहे. कोण्या पर्यटकाला हा योग लाभला असेल असं मला तरी माहिती नाही. पूर्वेला म्हणजेच डाव्या बाजूला गड नदीचे पात्र तर पश्चिमेला म्हणजे उजव्या बाजूला अथांगसागर तीर या दोन्हीच्या मध्ये तोंडवली आणि तळाशील ही गावे वसलेली आहेत.

आचरा-देवगड हमरस्ता हा सड्यावर आहे.. आपण तोंडवळी फाटा घेतला की उंची कमी होत जाते आणि आपण हळूहळू समुद्रसपाटीला येतो. या विस्तीर्ण सड्यावर जंगल आहे त्या जंगलामध्ये पट्टेरी वाघ राहत असे असं स्थानिक सांगतात. पुढे भक्ष कमी झाल्यानंतर त्यांचा वावर कमी झाला पण बिबट्या वाघ मात्र दिसतो असं इथे सांगितलं जातं. या गावाचं वैशिष्ट्य असं की इथल्या शिवालयामध्ये मुख्य भक्त म्हणून वाघाला मान मिळालेला आहे त्यामुळे इथल्या देवळाचं नाव आहे वाघेश्वर देवस्थान.

गावात शिरण्यापूर्वी उजवीकडे आपल्याला दिसते तिथली प्राथमिक शाळा आणि आरोग्य केंद्र आणि डाव्या बाजूला थोड्याशा झाडीतून काही दगडी पायऱ्या वर जाताना दिसतात. तिथे अडीच फूट लांब रुंद असलेली एक गुहा किंवा मानवनिर्मित दगडी खोली आहे. तिथं बिबट्या वाघाचा अधिवास आहे असं ग्रामस्थ सांगतात. या ठिकाणी कधी कधी तुम्हाला अचानक व्याघ्रदर्शन होऊ शकतं पण आजतागायत कोणत्याही मनुष्याला इथं बिबट्यांनी कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवल्याचे ज्ञात नाही.

कधी कधी हे बिबटे वाघेश्वराच्या मंदिरातही दिसलेले आहेत त्यापैकी दोघांच्या समाध्या ही आपल्याला मंदिरात पाहता येतात. बिबट्या म्हणजे वाघा पेक्षा थोडा छोटा असलेला शिकारी त्यामुळे गावाच्या माणसाच्या संपर्कात आला तर गुरांची किंवा घरातल्या कुत्र्यांची शिकार होणार यात काही नवीन नाही. पण तशाही घटना इथे अनुभवल्याचं कोणी सांगत नाही एक हे एक विलक्षण सहजीवनाचे उदाहरण म्हणता येईल.

क्षणभर अशी कल्पना करा की भल्या पहाटे तुम्ही तोंडवळीच्या समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करायला निघालेले आहात आणि तुमच्या पासून दूर काही अंतरावर एखादा बिबट्या त्याच्या एक दोन पिल्लांना घेऊन जात असताना दिसला तर मला भीती वाटेल की हा अनुभव गंमतशीर वाटेल आता तरी सांगता येत नाही.

मंदिरासमोरच एसटी स्टँड असल्यामुळे तिथे एक रिकामी जागा आहे तिथे माझं लक्ष वेधून घेतलं एकाच मार्गाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महाराष्ट्र घडावा म्हणून ज्या मंडळींनी बलिदान दिलं त्यांच्यापैकी एक या गावातील आहे त्यांचं हे स्मरण स्थळ.

इथे एखाद्या होम स्टे मध्ये राहायचं आणि मग गर्दी नसलेल्या समुद्रकिनाऱ्याचा पुरेपूर आनंद उपभोगायचा विशेषतः सकाळच्या वेळेला सूर्योदयानंतर लगेच या किनाऱ्यावर चांगली लांबलचक 11 नंबरची बस नेता येते.

इथून पुढे मालवण कडे जाताना वाटेत सर्जेकोटचा फाटा लागतो सर्जेकोट बंदरावरनं किंवा सर्जे कोट किल्ल्याच्या दिशेने जर तुम्ही गड नदीच्या खाडीकडे किंवा मुखाकडे पाहिलं तर वाळूची सुंदर पुळण आणि या दांड्याचा शेवटचा भाग आपल्याला पाहता येतो जर शक्य झालं तर जरूर पहा

Leave a Reply

Discover more from Darya Firasti

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading